राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं आज मुंबईत केली.

राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलैला या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात १२ जुलैला सुनावणी झाली.

समर्पित आयोगानं नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; १९ जुलै रोजी पुढची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही.

सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असं राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केलं आहे.

  • Website Designing