टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे राज्यातले खेळाडू निश्चित पदकं पटकावतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

२०२१ मध्ये राज्यातल्या खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये, अशी अडीच कोटी रुपयांचा निधी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वरूप उन्हाळकर, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे या ५ खेळाडूंना, मिशन ऑलिम्पिक अंतर्गत हे सहाय्य देण्यात आलं. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठीचा कोटा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • Website Designing